ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता,
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता.
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती,
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता..
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो,
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता…
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता.
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती,
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता..
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो,
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता…
-कवी ग्रेस
No comments:
Post a Comment